BANNER

The Janshakti News

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आवाहन



सांगली दि. 30 (जि.मा.का.) :  सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 1 त 2 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 38फूट 6 इंच इतकी आहे. आज कोयना धरणामधून 42 हजार 100, धोम धरणातून 453, कन्हेर धरणातून 4 हजार 622, उरमोडी धरणातून 500, तारळी धरणातून 3 हजार 526 व वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖